लग्न म्हणजे....
हल्ली लग्न म्हणजे काहीच नाही राहिलं,
नात्याची कोणाला किंमतच राहिली नाही,
पाहिजे तेव्हा लग्न करतात थोडं काही झालं का लगेच divorse देतात,
लग्न म्हणजे सात जन्म साथ दिलेली वचनं असतात की सुख दुःखात आम्ही सोबत राहू अशी वचनं घेतलेली असतात एवढं सोपं वाटलं का तुम्हाला लग्न ,
कधी ती आजारी असली का तो कामाला सुट्टी घेऊन तिची काळजी घेईल हे माहीत असून की एक दिवसाचा पगार कापला जाईल कारन तिला कधीच एकटं नाही सोडणार अशी तिच्या बाबांना वचन दिलेलं असतं ,
लग्न म्हणजे adjustment असते जे करतात दोघ एकमेकांसोबत त्यांच्या आवडी निवडी बाजूला ठेऊन जी परिस्तिथी आहे त्यात कस भागवायच ह्याचा विचार करतात ,
लग्न म्हणजे एक परीक्षा असते ज्यात सुरवातीचे प्रश्न सोपे असतात पण शेवटी कठीण प्रश्नांना कस सामोरं जायचं ह्याच उत्तर शोधायला लागतो .
लग्न म्हणजे सांभाळून घेयचं असतं एकमेकांना मग ते चुका असो किंवा त्यांचा राग ,रुसवे ,फुगवे सगळं balance करावं लागतं .
लग्न म्हणजे एक आंनद आपल्या जोडीदारासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याचे ,
जे स्वप्न फक्त एकत्र बसून बघितले होते ते आता खरे करण्याची संधी .
लग्न म्हणजे एक गोड अनुभव जो सगळ्यांना भेटणार आहेत ज्यांनी ही post वाचली आहे म्हणून tension घेऊ नका कोणी single नाही राहणार,
सगळं नीट होईल आणि सगळं happy होईल .❤️
No comments:
Post a Comment