Sunday 24 December 2023

तुझ्या सोबत चालताना

तुझ्या सोबत चालताना


तुझ्या सोबत चालताना मी पण वचन दिले आहेत की मी तुला नेहमी खुश ठेवीन आणि फक्त बाहेरून दाखवण्यापूरता नाही तर मनानी सुद्धा ..

तुझ्या सोबत सात फेरे घेताना जशी ती गाठ घट्ट राहते तशी तुझ्या माझ्यातील गाठ पण घट्ट राहील खूप जन्म ..

जशी तू माझी उष्टी हळद लावली आहेस तसच तू माझ्या अर्ध्या आयुष्याचा भाग हलका केला आहेस,

तुझ्या सोबत चालताना खूप कठीण प्रसंग येतील पण ते शब्द मी कधीच मागे नाही घेणार जे तुला लग्नाच्या वेळेस दिले होते ,

मला माहित आहे आई वडिलांना सोडून परक्या माणसांच्या घरी आपण एक दिवस सुद्धा नाही राहू शकत नाही, तुझं तर पूर्ण आयुष्य जाणार आहे ,
तरी मी पूर्ण प्रयत्न करीन तुला घरच्यांची आठवण नाही येणार ते त्या दिवसापासून ..

हा एवढं सोपं नसणार आहे माहीत आहे पण जबाबदारी आल्यावर बरोबर सगळं होत,आपण पण adjustment करायला लागतो त्याप्रमाणे ..

तुझ्या बाबांना सांग लग्नाचं जास्त tension नका घेऊ ,काही problem आलं पैश्याच तर आपण एकत्र मिळून खर्च करू .

अस होत की लग्नाच्या वेळेस कोणी ना कोणीतरी रागवत म्हणून सगळ्यांना सांभाळून घेईला लागेल ,कारण प्रश्न फक्त आपला नाही आहे तर आपल्या कुटुंबाचा सुद्धा आहे .

ते सगळं ठीक आहे फक्त तू नेहमी माझ्या सोबत रहा बाकी सगळं बघून घेऊन आपण ..❤️😊

लग्ना आधी तरी सगलेच खूप promise करतात .
आपल्या जोडीदाराला ..
पण तेच promise लग्ना नंतर का
अपुरे राहतात ते कळत नाही…

लवकर विवाह "न" जमण्याची काहीं कारणे..!



लवकर विवाह "न" जमण्याची काहीं कारणे..! 

चालू वर्षी गुरूबल नाही, चंद्रबल नाही. त्यामुळे योग नाही. असं असणाऱ्यांची संख्या अल्प असते. पण पूर्ण दैवावरच हवाला ठेवून हतबल राहाणाऱ्यांची संख्याही बरीच असते. संधी ही अनेकदा येत असते. म्हणजे योग अनेकदा येत असतो. नशिब ५०% असतं. परंतु आपले प्रयत्नही ५०% असायलाच हवे असतात.

(उदा. जेवणाचे ताट समोर आले आहे. 
पण आपण हातच हालवला नाही तर...?)

अनेकांच्या बाबतीत हेच घडतंय. पाचेक वर्षातील अनुभवांती जे दिसलंय ते स्पष्टपणे लिहिलय..!

▶ एखादे स्थळ चालून आले आहे. 
त्वरित प्रतिसाद न देणे.

▶ स्थळ पाहून झाल्यावर स्वतः काही न कळवता दुसऱ्याच्या उत्तराची वाट पाहाणे.

▶ होकार / नकार कळविण्यात टाळाटाळ किंवा विलंब करणे.

▶ फोन आला असता- "मग सांगतो, विचारून सांगतो" असे म्हणून घोंगडे भिजत ठेवणे. म्हणजेच त्या स्थळाला दुसरीकडे जायला वाट मोकळी करून देणे.

▶ वधू-वर केंद्राकडून कित्तीही बायोडाटे आले तरी आणखी काही नविन येताहेत कां? याची वाट पहात राहणे.

▶ सगळं सगळं जुळत असतानाही ह्याही पेक्षा आणखी कुठं असेल कां? हा शोध चालूच ठेवणे.

▶ शुल्लक बाबीचा दोष काढणे. रंग' उंची, पगारातील तफावत, शेती नाही. (असली किंवा घेतली तर कसणार कोण ?) पुणे, मुंबईत फ्लॅट नाही. (आपण पुण्यात आलो तेंव्हा होता कां?) जमवण्या पेक्षा फिस्कटवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे.

▶ मेकअप थापलेले व खास तयार करून घेतलेले फोटो पाठवून स्थळांची फसवणूक करणे. (जसं आहोत तसा फोटो असावा. व्यक्तीमत्व महत्वाचे असते. प्रसन्न चेहरा व बोलण्यातील गोडवा हाच आपला ठसा उमटवण्याची साधने आहेत)

▶ अनेक वेळा अनेक फोटो मागवणे. प्रत्यक्ष मुलगा / मुलगी न पाहाता फोटोवरून रंग, चेहरा, बांधा, स्वभाव ह्याचा (खोटा) अंदाज बांधणे.

▶ प्रत्यक्ष भेट देवून पाहणे, समक्ष मुलगा/ मुलगी त्यांचे कुटुंबिय ह्यांच्याशी भरपूर बोलणे. वय, शिक्षण, नोकरीचे ठिकाण इ. बाबीकडे जातीने लक्ष न देता, भलत्यानांच फोन करुन गुप्तहेर असल्यासारखे माहित्या काढणे, पण स्वतः घर सोडणे नाही.

▶ "रजा नाही." "वेळ नाही". अशी लांबड लावून हातचे स्थळ घालवणे. (जणू कंपनी बंद पडतेय.) पाहूण्यांपैंच्या लग्नाला मात्र हजर. (तिथं अंदाजपंचे शोध सुरू ठेवणे.)

▶ मुलां / मुलींनी काही कारणे पुढे करून, टाळाटाळ करणे व पालकांनी आपला संसार विषयक अनुभव गुंडाळून ठेवून त्यांचेच समर्थन करणे.

▶ आपण स्वतःला आरशात न पहाता इतरांचे माप काढणे.

▶ टीव्ही, चॅनेल वरील हिरो, हिरॉईन प्रमाणे संसाराचा साथीदार असावा. अशी भ्रामक कल्पना बाळगणे.

▶ पालकांनी बऱ्याच वेळा फोन बंद ठेवणं, लवकर फोन न उचलणं, स्वतः पुन्हा फोन न लावणं.

▶ पालकांनी वधू-वर केंद्राकडे स्वतःचा किंवा घरातील व्यक्तीचा व्हॉटअॅप नंबर न देणं. (त्यामुळे माहिती, याद्या, फोटो बाहेरगावी -मुलां, मुलींकडेच जातात. ह्यातील सगळं घरच्यां पर्यंत पोहोचतच असं नाही.).

▶ स्थळाची पसंती करणारे प्रमुख घटक म्हणजे - दोन्ही कडील आई, वडील, मुलगा व मुलगी आणि कुटुंबातील काही घटक. ह्यानी सर्व चौकशी करुन विवाह निश्चिती करण्या ऐवजी अनेकांना वेळोवेळी बघण्यासाठी पाठवणे. आणि त्या बघ्या मंडळीवर अधिक विश्वास ठेवणे.

▶ मुलगी पाहाणे ह्या कार्यक्रमाचे वेळी मुलगा व मुलीस आपसात संवाद साधणेसाठी किमान दहा मिनीटे तरी वेळ देण्यास टाळाटाळ करणे. ('जे आयुष्यात पहिल्यांदाच भेटताहेत व पुढं उभं आयुष्य काढायचंय त्यांचेसाठी मतं मांडायला संधी हवीय हो!').

▶ कुटुंबात ऐनवेळी मतभिन्नता उफाळून येणे.
▶ मुला/मुलींचं वय अधिक वाढलं तरी सुद्धा बिनधास्तपणे, असतात, मिळतात अशी सुद्धा स्थळं ? असं म्हणत राहाणं. (विवाहात वयाला महत्व असते. बाकी सर्व गौण असते याचे भान विसरणे!).

▶ मुलां / मुलींनी एका वेगळ्याच विश्वात रममाण होऊन राहणं / करिअरच्या नादात विवाह लांबणीवर टाकणं . (वय वाढतं, सौंदर्य घसरू लागते. तब्बेत पसरू लागते किंवा घटू लागते. केस, नजर साथ सोडू लागतात. कदाचित संतती प्राप्ती बाबत काहींना समस्याही निर्माण होण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं. म्हणून वय वाढल्यावर काहीही पत्करण्या पेक्षा योग्य वेळेत निर्णय घ्यावा.).

▶ कुटुंबातील व्यक्तीनी आपलं पद, प्रतिष्ठा, पैसा ह्यांची तुलना येणाऱ्या स्थळांबरोबर करणं. (प्रत्येकाचं नशिब वेगळं असतं.)

▶ पत्रिका पाहाताना खूप म्हणजे खूपच खोलात शिरणे. (यासाठी वरील ऑडिओ पूर्णपणे ऐकवा?) चांगलं भरपूर असलं तरी, थोडं दोषाचं दिसताच (इतर ठिकाणी पत्रिका न तपासता... पटकन नकार देणं. 
(आता सगळ्यानां सगळे ग्रह विशेषतः मंगळ कळायला लागलाय. पालकांच्या लग्नावेळी असं होत कां? जन्म तारखा खऱ्या होत्याकां? शाळेत घातलेली तारखेपासून ५ किंवा ६ वर्षापूर्वी चा दिवस हा जनमतारिख असायची) 

▶ सगळं पक्क झालं तरी बैठकीत कार्यालय कुठे? कसे आहे? जेवणात पदार्थ, बेत कसा आहे?
 (त्रयस्तांनी गोंधळ केला की पालकांनी मूग गिळून गप्प बसणे !

▶ मुलीच्या पालकानीच अधिक भार उचलावा म्हणून अडून बसणे. 
(जणू मुलगी देवून ते फार मोठी चूक करत आहेत?) 
(ह्या वेळी मुलगा आणि मुलगी ह्यानी केलेल्या पसंतीचा, भावनेचा विचार केला जात नाही.)

▶ (क्वचित जर न जाणो) बाहेर कुठं कुणाच जमलं असेल तर.. 
(पालकांना अंधारात ठेवून) येणाऱ्या प्रत्येक स्थळांना नकार देणे. 
(वास्तविक पालकांशी बोलून यातूनही योग्यतो मार्ग काढायला हवा आणि तो काढता येतो यावर विश्वास नसणे!).

▶ विवाह ठरत आला असतानाच कुठून तरी काहींतरी विपरित किंवा अफवा कळताच त्या बाजूच्या माणसांना भेटून खरं खोटं शहानिशा न करताच पटकन नकार देणे.

▶ (कुठल्याही) वधू-वर सूचक केंद्राकडे नाव न नोंदविणे. (एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक स्थळे उपलब्ध होत असताना थोडी तरी असलेली देणगी फी भरण्याची इच्छा नसते. मात्र अंदाजपंचे फिरण्यात व लग्नकार्यात मोकाट कितीतरी खर्च होत असतो तो हिशोबात नसतो.)

▶ वधू-वर, पालक मेळाव्यांना उपस्थित न राहणे (मुला मुली ऐवजी स्वतःच हजेरी लावणे. 
(प्रत्येक वधुवर सूचक केंद्रा कडून स्थळांची यादी, फोटो उपलब्ध होतातच. त्या शिवाय उपस्थितांकडून त्यांच्या नातेवाईकांतील स्थळे माहित होत असतात. वधू-वरांना समक्ष पाहाता आल्यामुळे अनेक गावे फिरण्याचा वेळ, खर्च वाचतो. संचलकांकडून खूप मौलिक माहिती, उदाहरणे वअनुभव ऐकायला मिळतात. पुढची वाटचाल सोपी होते.)

▶ ह्यापैकी काही किंवा इतरही काही कारणे अशी असू शकतात. (गेल्या पाचेक वर्षातील इच्छापूर्तीच्या स्वअनुभवावरून इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय!)

▶ योग्य वाटल्यास किंवा योग्य असेल ते घ्यावे. आवडले तर पुढे पाठवावे, कारण बदल घडवायचा असेल तर एक व्यक्ती किंवा एखादी संस्था काही नाही करू शकत, तुमच्या मदती शिवाय... नाही का?

▶ आयुष्यात कार्य सफल व्हायच असेल? पुढं जायचं असेल? 
तर... तडजोड ही करणे आवश्यक च असते!

Friday 22 December 2023

साथ तुझी हवी !

साथ तुझी हवी.... !


अश्रू माझ्या डोळ्यात दिसताच अलगच हातानी पुसून जवळ घेणारा तू हवास ….
चूक झाली तरी कधी न ओरडता सगळं सांभाळून घेण्यासाठी तू हवा…

कधी Phone नाही उचलला म्हणून फुगून बसले तर मला मनवुन घेणारा तू हवा ..
ते promises वगैरे न देता direct घरी मागणी घालून मला तुझ्या घरी नेणारा तू हवास….

कधी रागावून तू बसलीस की काहीतरी surprise घेऊन तुला खुश बघण्यासाठी तू हवीस..,
माझ्या सगळ्या गुण-दोषासकट मला Accept करण्यासाठी मला तू हवीस..

कधी बाहेर फिरताना कोणी बघितला आणि मला विचार की ही कोण आहे तर मला गप बसून ‘बायको आहे मी याची काही problem आहे का ‘ अस स्पष्टपणे सांगण्यासाठी मला तू हवीस..

दोघांनाही साथ लागते रे एकमेकांना अस Onside नाही टिकत जास्त वेळ …
या नात्यात कधी कोणी मोठा किंवा छोटा नसतो ,दोघांनाही एकमेकांना सांभाळून घेयला लागतो तेव्ह नात टिकतं…
सगळ्यांच नात असच तिकुदे अशी प्रार्थना करतो देवाकडे…❤️



Monday 18 December 2023

सवसार...

सवसार
 

तुम्ही प्रेम करता एकमेकांवर सगळं मान्य आहे त्या verification फक्त लग्न झाल्यावरच भेटतं ,
फक्त msg वर propose accept करून काही होत नाही त्यासाठी सात जन्मांचे फेरे घ्यावे लागतात .

सवसार म्हणजे बैलगाडी ची दोन चाक असतात ,ते सोबत असतात तितपर्यंत सगळं ठीक असतं जेव्हा एक जरी चाक तुटलं पूर्ण सवसार उध्वस्त होतो .

मी अस नाही बोलत की सवसार करणं अवघड असतं ,ते अवघड किंवा सोपं ते तुमच्यावर असतं तुम्ही एकमेकांना कशी साथ देता त्यावर अवलंबून असतं ..

भांडण होतात ते सगळं normal आहे रे कारण दोन विचारांची माणसं एकत्र आल्यावर मतभेद तर असणारच पण त्याची हळू हळू सवय होऊन जाते .

सुरवातीला आपल्याला त्यांच्या काही गोष्टी नाही पटत पण ती व्यक्ती तशीच आहे असं समजून आपण त्याच विचार करणं सोडून देतो ..

प्रेम आणि लग्न यात खूप अंतर आहे रे ,सगळेच प्रेम करणारे लग्न नाही करत ,क्वचितच काही असतात जे पुढे जाऊन लग्न करतात …

Normal life ते married life मध्ये लग्न हीच एक विधी असते जी आपलं आयुष्य बनवते किंवा बिघडवते ..
एकदा लग्न झाल्यावर तुम्ही एकमेकांना दोष नाही देऊ शकत की यांच्यामुळे अस झालं किंवा यांची चुकी होती ,

चूक दोघांचीही असते यात कारण टाळी फक्त एका हाताने वाजत नसते 
उलट सवसार पण अस करा लोकांनी पण नाव ठेवली पाहिजे की किती सुंदर couples आहेत हे ..

सगळे फक्त अक्षदा टाकने पुरतेच तुमच्यासोबत असतील नंतर सवसार त्या दोघांनाच चालवावा लागतो ..❣️


नवरा - बायको


नवरा - बायको 


त्याचं नात कसलं सुंदर असतं ना दुःख तिला झाले का सावरणारा तो असतो ,इजा त्याला झाली का सांभाळून घेणारी ती असते .

त्यांच्या मध्ये कधीच पैसा येत नाही कारन दोघांना आपापल्या जबाबदाऱ्या माहीत असतात म्हणून Adjustment करायला शिकले असतात.

तिचे सगळे स्वभाव त्याला बरोबर माहीत असतात जेणेकरून ती कोणावर कधी रागावली की तो त्यांना जाऊन सांगतो
” अहो तिचा स्वभावच तसा आहे थोडयावेळाने होईल ती Normal”

आणि कधी कुठे गेल्यावर तो कधी कोणाशी नाही बोलल्यावर ती सांगते ” अहो त्यांचा स्वभाव शांत आहे जरा त्यांना जास्त बोलायला नाही आवडत “.

आपल्याला मुलगा/मुलगी झाल्याचा सर्वात जास्त आनंदमध्ये स्वतःकडे पैसे नसतानाही ,मित्रांकडून पैसे घेऊन महागतले पेढे आणून सर्वांना वाटतो .

कधी अचानक आपल्याला बायकोला एक साडी gift करतो ,तिच्या चेहऱ्यावरच आनंद बघण्यासाठी तेच तर लागतं ना सवसार चालवण्यासाठी .

कधी आपल्या नवऱ्याचा पगारणी सगळं नाही भागत हे बघून ती पण घरत काहीतरी धंदा चालू करते जेणेकरून त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठली अडचण नाही येणार .

सवसार चालवणं एवढं पण सोपं नसतं जेवढं दिसत आणि जे ज्यांचं सगळं नीट चालू आहे त्यांच्या मागे त्याची खूप मेहनत असत ते आपल्याला दिसत नाही .

तीला पण नवीन लग्न झाल्यावर खूप adjustment कराव्या लागतात कारण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात .

नवऱ्याला सोडून ती जास्त कोणाला ओळखत नसते म्हणून सुरवातीला थोडास problems येतात सगळ्यांचे स्वभाव ओळखण्यास ..

लग्नाची सात वचने

लग्नाची सात वचने 



पहिला वचन ती असं मागते की की कुठल्याही धार्मिक कार्य करताना जसं आज मी तुमच्या बाजूला बसली आहे तस तेव्हा पण मी तुझ्यासोबत बाजूला असेन .

दुसरा वचन ती बोलते की ज्याप्रमाणे आई-वडिलांचा सन्मान करतोस तसं माझ्याही आई-वडिलांचा सन्मान कर आणि त्यांचा आदर ठेव..,

तिसऱ्या वचना मध्ये ती असं बोलते की मला आजपासून ते म्हातारपण पर्यत माझा नीट सांभाळ करत राहशील जर हे तुला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार आहे.

चोथ्या वाचनात ती अस बोलते की तू कुठल्याही कर्तृत्वा पासून पळू नाही शकत आणि कुटुंबाचा सगळ्या गोष्टीचा सांभाळ तुम्ही करणार असाल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.


ती पाचवा वचन अस मागते की तुझ्या सगळ्या पैश्याचा लेन-देणं किंवा त्या जोडून असलेल्या गोष्टी करत असताना माझ्याशी त्याविषयी नक्की चर्चा करा ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सहावे वचन ती अस मागते की माझ्या मैत्रिणी किंवा आई-वडिलां समोर माझा अपमान कधी करणार नाही आणि वाईट व्यसनां पासून लांब राहशील ही गोष्ट मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.

सातवे वचन ती अस मागते की तू दुसऱ्या कुठल्या स्त्रीला ला बहिणीच्या किंवा आईच्या नजरेने बघशील आणि आपल्या दोघांमधे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आणणार नाहीस जर तूला मान्य असेल तर मी तुमच्यासोबत येण्यास तयार असेन.❤️🔥

लग्न म्हणजे

लग्न म्हणजे....


हल्ली लग्न म्हणजे काहीच नाही राहिलं,
नात्याची कोणाला किंमतच राहिली नाही,
पाहिजे तेव्हा लग्न करतात थोडं काही झालं का लगेच divorse देतात, 

लग्न म्हणजे सात जन्म साथ  दिलेली वचनं असतात की सुख दुःखात आम्ही सोबत राहू अशी वचनं घेतलेली असतात एवढं सोपं वाटलं का तुम्हाला लग्न ,

कधी ती आजारी असली का तो कामाला सुट्टी घेऊन तिची काळजी घेईल हे माहीत असून की एक दिवसाचा पगार कापला जाईल कारन तिला कधीच एकटं नाही सोडणार अशी तिच्या बाबांना वचन दिलेलं असतं ,

लग्न म्हणजे adjustment असते जे करतात दोघ एकमेकांसोबत त्यांच्या आवडी निवडी बाजूला ठेऊन जी परिस्तिथी आहे त्यात कस भागवायच ह्याचा विचार करतात ,

लग्न म्हणजे एक परीक्षा असते ज्यात सुरवातीचे प्रश्न सोपे असतात पण शेवटी कठीण प्रश्नांना कस सामोरं जायचं ह्याच उत्तर शोधायला लागतो .

लग्न म्हणजे सांभाळून घेयचं असतं एकमेकांना मग ते चुका असो किंवा त्यांचा राग ,रुसवे ,फुगवे सगळं balance करावं लागतं .

लग्न म्हणजे एक आंनद आपल्या जोडीदारासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याचे ,
जे स्वप्न फक्त एकत्र बसून बघितले होते ते आता खरे करण्याची संधी .

लग्न म्हणजे एक गोड अनुभव जो सगळ्यांना भेटणार आहेत ज्यांनी ही post वाचली आहे म्हणून tension घेऊ नका कोणी single नाही राहणार, 
सगळं नीट होईल आणि सगळं happy होईल .❤️

लग्न....

लग्न...




ती- तो आणि त्याचं सुरू झालेला सवसार 
आणि देवानी जुळून दिलेली नाती .
आयुष्यभर एकत्र राहण्याचे घेतलेले वचन सगळयांच्या साक्षीने आणि घातलेल्या सात फेऱ्या सुखाच्या सवसारच्या .

एक आनंद सगळयांच्या चेहऱ्यावरचा ,पाहुण्यांनी भरलेलं घर,
छोट्या मुलांची किलबिल .

सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात म्हणून आई-बाबांची चाललेली धडपड आणि आणि मनात थोडस लपवलेलं दुःख आपल्या मुलीच्या जाण्याच.

अंगाला लावलेली हळद त्या सोबत गाणारी गाणी आणि सगळ्यांची केलेली सोय आणि नाचण्यासाठी आणलेला Dj.
ठरलेली लग्नाची वेळ आणि त्या सोबतच भडजीने गायलेल्या मंगलाष्टक सोबत लग्नाच्या गाठी जुळलेल्या ..

जेवणाला लागलेली रांग आणि आहेर देण्याची लागलेली घाई आणि आठवणी जपून ठेवण्यासाठी काढलेले photo.

माहेरून सासरकडे जाण्याची वेळ आणि बांधलेला बसत्या सोबत पोहोचलेली गाडी.
डोळ्यात न समावणारे अश्रू सोबत दोघांनाही सुखी राहण्याच्या आशीर्वाद .❤️

लग्न म्हणजे खेळ नसतो....

लग्न म्हणजे खेळ नसतो....



काही जणांना खूप excitement असेल ना लग्नाची की आपलं पण लग्न व्हावं आपला पण सुखाचा सवसार व्हावा पण एवढं पण सोपं नसत रे ..

काही जणांना लग्नाची एवढी घाई काय असते काय माहीत ,
अरे पाहिले पैसे कमवा की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आयुष्य enjoy करू शकाल…✌️

करतात काही जण adjustment पण एवढी पण घाई करू नका की लग्न झाल्यानंतर दोन वेळा जेवायला काय बनवायचं याच पण विचार करावा लागेल…🔥

खूप पैसा लागतो रे लग्न बोलल्यावर ,आणि परत काही कमी पडल का लोक मागून बोलायला तयारच असतात कारण त्यांना कुठे माहीत असतं आपल्या आई-वडिलांनी कसे पैसे कमावलेत ते …❤️

लग्नाची एवढी पण घाई करू नका रे आपल्या आई-वडिलांकडे तेवढे पैसे आहेत का किंवा आपल्या पगारातून सगळं होईल का ते बघा पहिले…

लग्न करताना फक्त आपलाच विचार नसतो करायचा रे कारण सगळ्यांना सोबत घेऊन लग्न पार पाडण्यास जी मजा आहे ती कशातच नाही …😊

लोकांना वाटत लग्न झाल्यावर सगळं नीट होत पण ते तेव्हा जेव्हा तुमचे विचार तेवढेच mature असतील जेवढे तुमच्या जोडीदाराचे..❤️

सवसार...

सवसार...


जेव्हा कधी लोक बदलतील तेव्हा तू माझी सुखद सावली होशील ना ,
माझ्या पाऊल खुणांनावर तू पाऊल ठेऊन चालशील ना ,

सुखात सगळे असतील दुःखात सोबत असशील ना ,
ते जे लांबून आपल्यावर हसत होते त्याचं तोंड शांत करायला मला साथ देशील ना ,

तुझं सगळं ऐकीन फक्त कधी मी stress मध्ये असल्यावर मला समजून घेशील ना ,
गाडी वैगरे सगळं ठीक आहे पण कधी माझ्यासोबत 2 पावलं चालशील ना ,

ते जे sweet relationships अस नाव देतात त्याला तू लग्नाच्या नात्यात बदळशील ना ,
मला नको हुंडा वैगरे पण लावलेल्या रोपाला चांगलं मोठं झाड करशील ना ,

Hotel ल जाऊ कधीतरी पण पैसे नसल्यावर थोडी adjustment करशील ना ,
मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण माझ्या आई-वडिलांचा पूर्ण विश्वास जिंकशील ना .

कधी मी जास्त रागात असल्यावर नाही बोलणं होणार एखादं वेळेस
पण मला हा msg दाखवशील ना ,
मी कधी busy असलो आणि तुला कधी कंटाळा आला घरात बसून तर चालना आज बाहेर जाऊया अस विचारशील ना ..🔥❤️

दुःख येतील सवसारच्या वाटेवर तेव्हा त्या अश्रूंना आंनद अश्रुमध्ये
बदलायचं काम तू करशील ना ..

आपलं सवसार सुखाचा व्हावा असा पूर्ण प्रयत्न मी करिन पण तु पण त्या सवसाराचा अर्धा वाटा उचशील ना ..


प्रेम म्हणजे काय असतं ?

प्रेम म्हणजे काय असतं ?



सप्तपदीच्या सात फेऱ्या घेताना ची वचणे जरी पाळली नाहीत तरी त्या वचनानं प्रमाणे जगायचं असतं…
अगदी कुठल्याही परिस्तिथी मध्ये ‘मी कायम तुझ्यासोबत राहीन ‘ हे फक्त बोलून न दाखवता वेळ आल्यावर ते खरे करून दाखवायच असतं ..

नात एवढं घट्ट पाहिजे की समोरच्याने तुमच्याकडे बघितल्यावर बोलले पाहिजे की असे couples पाहिजेत...

दोन्ही घरातल्या माणसांना समजून त्यांच्यात मिसळण्याचे प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून सगळी नाती जपून राहतील ..
कधी भांडण झाली तर एकानी तरी शांत रहायचं असतं जेणेकरून तो राग जास्त न वाढता तिथेच संपून   जाईल ..

कधी ती अजारी असली का घरातील सगळी काम त्याने केली पाहिजेत आणि ते ही कुठलंही वाद न करता …
आपल्याला ही वस्तू घरात पाहिजे की नको हे नीट ठरवलं पाहिजे ,ते पैसे कामाच्या वस्तुतः वापरले  पाहिजे ..

हल्लीच्या जगात एकाने काम करून भागत नाही म्हणून दोघेही काहीतरी काम करून आपल्या मुलांच future कस चांगलं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे …

दोघांनीही एकमेकांना नवऱ्या बायको सारखं न वागता तुला काय enjoy करायचं आहे ते कर फक्त स्वतःला  सांभाळून अस एकमेकांना सांगायला पाहिजे …

त्या old boring couples सारखं न राहता दोघांनीही आपली life मस्त enjoy करायला पाहिजे …
कधीतरी Romantic झाला की ,अरे आज मी एकच cup चहा बनवलाय ,चालेल आण एकत्र पियुयात ..😍

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...